Author: admin

*कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : दिनांक 27 मे 2025 रोजी जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात एकूण सरासरी 16.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात 38.1 मिमी आणि गगनबावडा तालुक्यात 36.2 मिमी झाला आहे, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.* *नैसर्गिक आपत्ती दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यामधील नदी पातळी, धरण, वाहतूक व नुकसानाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे.* *नदी पातळी (पंचगंगा नदी): पंचगंगा नदीची पातळी (सकाळी 10 वाजेपर्यंत) खालीलप्रमाणे आहे.* राजाराम बंधारा: सद्याची पातळी 19.05 फूट (इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट). शिरोळ बंधारा: सद्याची पातळी 34.00 फूट (इशारा…

Read More

कोल्हापूर दिनांक 09 – उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम व निष्ठा व्यक्त करत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे गड-किल्ले पादाक्रांत करण्याचा संकल्प केला असून, आतापर्यंत त्यांनी ५२ किल्ल्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. सध्या ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेऊन शिवभक्तीत न्हालेल्या वातावरणात पुढील प्रवासास निघाले आहेत. त्यांच्या या अद्वितीय कार्याचा सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे उत्साहात सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला उदय भोसले, किशोर घाटगे, अभिजीत पाटील, अर्जुन आंबी यांसारखे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.…

Read More

कोल्हापूर दिनांक 05 – तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर मार्गावर छत्रपती शाहू महाराजांनी श्री दत्त महाराजांच्या महापूजा धूप आरती वेळी सनई-चौघडा व नगारा वाजवण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली होती ती बंद केली असल्याने पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेवक समिती महाराष्ट्र यांच्यावतीने अध्यक्ष सागर धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तीर्थक्षेत्र दत्तमंदिर मार्गावर सि. स. नंबर 469 व लगत जागेवर राजर्षी छ. शाहू महाराजांनी करवीर संस्थानातून जागा देऊन नगारखाना व धर्मशाळा बांधून तिथे श्री दत्त महाराजांची महापूजा धूप आरतीवेळी नित्यनेमाने 3 वेळेस सनई चौघडा व नगारा वाजवण्याची ऐतिहासिक परंपरा सुरू केली होती.सदरच्या परंपरा अखंडपणे चालू होत्या परंतु काही कारणास्तव ट्रस्ट…

Read More

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसर विकास आराखडा, सर्किट बेंच, विमानतळ आदी सर्व विषय गतीने मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया आणि राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होवूया, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते झाला, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारणा २०२१ व दत्तक नियमावली २०२२ नुसार १८ वर्षा आतील बालकांचे नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रिया व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेचे कामकाज महिला व बाल विकास विभाग पाहत आहे. जिल्ह्यातील नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रिया व सावत्र पालक दत्तक प्रक्रिया करु इच्छिणा-या नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे माहितीसाठी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी…

Read More

पुरवठा अधिकारी पदाचा लक्ष्मण माने यांच्यावर अतिरिक्त भार.निरीक्षकांना करावे लागत आहे क्लार्कचे काम. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज. कोल्हापूर दिनांक 18 – कोल्हापूर शहर अन्न पुरवठा विभागावर संपूर्ण कोल्हापूर शहराच्या जवळपास 6 लाख लोकसंख्येचा भार असून तो केवळ 3 ते 4 कर्मचारी वर्गावर आल्याने पुरवठा विभागावर ताण आला आहे.पुरवठा निरीक्षक, गोदाम निरीक्षक यांना सुद्धा क्लार्कचे काम करावे लागत असल्याने जादा कर्मचारी देण्याची गरज निर्माण झाली असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे. कोल्हापूर शहरात 5 ते 6 लाख लोकसंख्या असून जवळपास 75000 पेक्षा जास्त शिधापत्रिका शहर पुरवठा विभागांतर्गत कार्यरत आहेत.या शिधापत्रिकांचे नाव कमी करणे,नाव वाढवणे,शिधापत्रिका विभक्त,अन्न धान्य लागू करणे…

Read More

कोल्हापूर दिनांक 16 – कोल्हापूर महानगर पालिके अंतर्गत येणाऱ्या रविवार पेठेतील शेलाजी वन्नाजी शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर वय – 52 वर्षे रा.सांगाव रोड,दत्त कॉलनी,कागल जिल्हा. कोल्हापूर याला रु 3000 ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.शाळा सोडल्याचे दाखले देण्यासाठी पैशाची मागणी केल्याने तक्रारदाराने तक्रार देऊन कारवाई केली. तक्रारदार यांनी जातीचा दाखला काढण्यासाठी त्यांचे वडिलांचा व पाच चुलते असे एकूण सहा शाळा सोडल्याचे दाखले मिळणे करिता महानगरपालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालय शाळा क्रमांक 24 येथे गेले असता शाळेचा मुख्याध्यापक संजय नार्वेकर याने रु 500 प्रमाणे एकूण सहा दाखल्यांचे 3000 रु लाचेची मागणी केली.त्यानुसार लाचेची मागणी…

Read More

कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाचे महाविद्यालय असून महाविद्यालय शंभर वर्षाहून जुने व अनेक विद्वान लोकांना घडवलेले महाविद्यालय आहे पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाविद्यालयाचा स्तर खूप ढासळत आहे ते पुढील प्रमाणे… १) तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना मार्च महिन्यामध्ये पूर्ण 31 तारखेपर्यंत काम करण्यास लावण्यात आले व नंतर 23 मार्च पर्यंतचे बील देणार असे सांगण्यात आले. याचबरोबर मागील तीन महिन्यापासून तासिका तत्वावरील शिक्षकांचा पगार देखील देण्यात आलेला नाही, यामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे आर्थिक स्थिती बेताची झालेली आहे. २) राजाराम महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असणारे काही शिक्षक चार ते पाच महिन्यातून एकदाच तास घेतात बाकी सर्व काम सीएसबी कडून करून घेतात. वास्तविक…

Read More

*जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* मुंबई दि. 15 :- जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा’ शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झाले. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यातील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक पालकमंत्री महोदयांनी सक्रिय सहभागी घेऊन कामे करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन मंत्रालयातील मंत्रीमंडळ सभागृहात झाला. त्यावेळी जलसंपदा (…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार दिगंबर सानप, आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Read More