Author: admin

कोल्हापूर, दि. २ (जिमाका): कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात पॉश अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यानुसार १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था आणि आस्थापनांमध्ये महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती (ICC) गठीत करणे बंधनकारक आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील कार्यालये व संस्थांची विशेष मोहिमेंतर्गत अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत न केलेल्या २३ कार्यालये व संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तत्काळ अंतर्गत तक्रार समिती…

Read More

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, मर्या गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्याकडून एकूण रक्कम 6 लाख 81 हजार 22 रुपये व 10 लाख 15 हजार रुपये अशी एकूण 16 लाख 96 हजार 22 रुपये इतकी रक्कम वसुल करण्याकरिता साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, मर्या. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या मालकीची सि.स.नं 1109/ब, ई- वॉर्ड कोल्हापूर पैकी कसुरदार यांच्या हिस्सेपुरती मिळकत पत्रिकेमध्ये नमूद असलेप्रमाणे स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 16 लाख 96 हजार 22 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर येथे 11 सप्टेंबर रोजी सकाळी…

Read More

कोल्हापूर 31 (जिमाका): मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत राधानगरी 33/11 के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त 5 मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्र स्थापित करुन कार्यान्वित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत राधानगरी 33/11 के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त 5 मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्रचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, गट विकास अधिकारी डॉ. संदिप…

Read More

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असून, त्याचा थेट प्रकाश डोळ्यांवर पडल्याने डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबुळाला इजा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने भाविकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच अन्य कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईटचा वापर प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक…

Read More

कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुका तसेच इतर कार्यक्रमांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters गॅसचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. या काळात विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. काही मंडळांकडून मिरवणुकांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या वापरामुळे मिरवणूक पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः मानवी…

Read More

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्याने त्यासाठी प्रस्ताव सादर करू नयेत. असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर खरेदी 4 लाख रु.व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख…

Read More

कोल्हापूर दि. 24 (जिमाका): छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना व स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) सोलर योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात दोन ऑक्टोबर पर्यंत एक लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना गतिमान करून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. रूफ टॉप सोलर प्रकल्प समन्वय व अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस, एम.एस. मिसाळ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री…

Read More

कोल्हापूर दिनांक 23 – करवीर पोलीस ठाणे अधिकारी आणि अंमलदार यांचा आज रोजी झालेल्या गुन्हे परिषदेत अलीकडेच कोल्हापूरमध्ये घडलेल्या गर्भलिंग निदानच्या गुन्ह्यात केलेल्या कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.यावेळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कळमकर व ठाणे अंमलदार उपस्थित होते.

Read More

कोल्हापूर दिनांक 23-  वकिली व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या वकील बंधू आणि भगिनींसाठी न्यायाधीश होण्याची सुलभ संधी निर्माण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशस्तरावरील न्यायिक सेवा परीक्षेसाठी आवश्यक असलेला 3 वर्षांचा वकिली अनुभव बदलून 1 वर्षाचा केला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे कायद्याची पदवी घेतलेल्या तरुणांना न्यायिक सेवा परीक्षेला बसण्याची संधी लवकर मिळेल. निवडीनंतर उमेदवारांना प्रशिक्षण आणि न्यायालयीन कामाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.त्यामुळे तरुण होतकरू वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.त्यामुळे जास्तीत जास्त वकील या संधीचा लाभ घेऊन देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात 1 हजार 400 नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया सध्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकष व अटी-शर्ती लागू झाल्याने नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीच्या जाहिरनाम्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 400 केंद्रांच्या वाटपासाठी एकूण 3 हजार 617 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून प्रारूप यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती घेऊन मुलाखती घेण्याचे नियोजन प्रस्तावित होते. दरम्यान, 9 जुलै रोजी आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपाबाबत नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. या निर्णयातील सुधारित निकष व अटी-शर्ती…

Read More