Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दि. 4 (जिमाका): राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी https://hmas.mahait.org या शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर प्रवेश अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक देण्यात आले आहे. शासकीय वसतीगृह पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- बी.ए./बीकॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी – 25 फेब्रुवारी ते 10 मार्च, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व…
कोल्हापूर दि :4 (जिमाका) केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेचा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे.या जनगणनेच्या कामासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हे काम निर्धारित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे,असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार ते सहा मार्च या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे .या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16 मार्चपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर हा केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने (पट्टा घट्ट बांधून) वापरणे अत्यावश्यक आहे. वाहन चालविताना चालकासह मागील…
कोल्हापूर, [दिनांक] – कोल्हापूरचे सुपुत्र मेधप्रणव बाबासाहेब पोवार यांच्यासाठी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मिती हा केवळ व्यवसाय नसून, अभिव्यक्तिचं परिणामकारक आणि सर्वोच्च माध्यम आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे कोल्हापूरचे नाव देशाच्या नकाशावर कोरणाऱ्या मेधप्रणव ने पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संपूर्णपणे कोल्हापूरात चित्रित झालेला त्याचा नवीन लघुपट ‘तत् त्वं असि’ जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसेस पात्र ठरत आहे. ‘तत् त्वं असि’ अर्थात “ते तूच आहेस” – ही एक आत्मशोधाची भावपूर्ण कथा आहे. परदेशी स्थलांतरित झालेल्या पण आपला वारसा मारणोपरांतही जपला जावा अशी इच्छा असलेल्या एका भारतीय स्थलांतरिताची आणि त्याच्या मुलाची ही कथा आहे. वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्या शेवटच्या काही इच्छा…
कोल्हापूर दि : 2 (जिमाका) शुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण हल्ली अधिक वाढत आहे .यामध्ये पती – पत्नीने सामंजस्याने वागणे आवश्यक आहे .कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबाला जोडण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून काम करते. खऱ्या अर्थाने ते दुवा आहे असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी केले . कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोशिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावा वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या . व्यासपीठावर तांबे एस.एस जिल्हा न्यायाधीश – 4 तथा सदस्य कौटुंबिक न्यायालय सल्लागार समिती, बार असोसिएशन अध्यक्ष व्ही आर पाटील…
कोल्हापूर, दि.०२ : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण १२२ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित ३८ अर्जांचा समावेश आहे. महसूल शाखेंतर्गत करवीर तहसील कार्यालयाकडे ५, पन्हाळा तहसील कार्यालयाकडे ११, तर इतर महसूल कार्यालयांकडे २२ अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर शासकीय विभागांकडे एकूण ८४ अर्ज प्राप्त झाले असून , त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित सर्वाधिक १९ अर्जांची नोंद झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे १८, भूमी अभिलेख विभागाकडे १०,…
कोल्हापूर, दि. २* : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाची ध्येयधोरणे आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी व्यक्त केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ‘जिल्हा जनगणना कार्यालयाचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुख्य आढावा बैठकीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा प्रमुख जिल्हा जनगणना अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव, उपसंचालक जनगणना प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह…
नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक लंगर सेवेचा लाभ घेतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची…
नवी मुंबई दि 28 फेब्रुवारी : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्ष, दंतरोग तज्ञ कक्ष, अस्थिरोग तज्ञ कक्ष, कान-नाक-घसा तज्ञ कक्ष, हृदयरोग तज्ञ कक्ष, मेडिसिन विभाग, तसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता. विशेष म्हणजे…
कोल्हापूर दिनांक 27- मराठा क्रांती मोर्चातील अमूल्य योगदानाची दखल घेत, सागर धनवडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे,डॉ.कृषीराज टकले पाटील यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. या नियुक्तीबद्दल बोलताना राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य भूषण मराठा रत्न डॉ.सागर काळे यांनी विश्वास व्यक्त केला की, सागर धनवडे यांच्या अनुभवामुळे संघटनेला मोठी ताकद मिळेल. याप्रसंगी राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष इतिहास संशोधक रवींद्र राजे जगदाळे, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजित घोरपडे गजेंद्रगडकर…