Author: admin

१२५ दिवसांची रोजगार हमी, विकसित ग्रामपंचायत आराखड्यावर भर कोल्हापूर, दि. २ : विकसित भारत – जी-राम-जी हा केवळ रोजगार देणारा कार्यक्रम नसून कामाची कायदेशीर हमी देणारा कायदा आहे. पात्र व्यक्तींना विहित कालावधीत काम उपलब्ध करून देता आले नाही, तर त्यांना भरपाई मिळणार आहे. या कायद्यामुळे गाव-खेड्यांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधला जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विकसित भारत – जी-राम-जी (VB-GRAM G)’ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, विकसित भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा. पारदर्शकता हे या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य असून…

Read More

कोल्हापूर, दि. 02 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 2 ते 15 जुलै या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार…

Read More

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार) सन 2026-27 राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, पेरू पिकासाठी सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 14 जुलै आहे. योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी किमान उत्पादनक्षम फळबाग क्षेत्र 20 गुंठे (0.20 हेक्टर) असणे आवश्यक असून, प्रति शेतकरी कमाल 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर महसूल मंडळातील पेरू पिकासाठी प्रति हेक्टर 70 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 3 हजार 500 रुपये विमा हप्ता भरावा…

Read More

कोल्हापूर, दि. १ जुलै : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजार ४०९ खातेदार शेतकरी यात सद्या पात्र आहेत. कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, शेतकऱ्यांना नव्याने कर्जपात्र बनविणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले…

Read More

कोल्हापूर, दि. 01 (जिमाका) : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळणार असून, दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार करावे व विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. सध्या उपलब्ध असलेल्या काही इंटर्नशिप संधींमध्ये चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे सेल्स अँड मार्केटिंग पदासाठी अर्जाची…

Read More

कोल्हापूर, दि. 01 (जिमाका): पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग व अंबिया बहार 2026-27 या एक वर्षाच्या कालावधीकरिता राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मृग बहारामध्ये जिल्ह्यामध्ये पेरू या फळपिकासाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. तर अंबिया बहारामध्ये आंबा (क), काजू, केळी (ब), नारळ (ब) या फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या फळपिकांकरिता प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता आणि योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे –  आंबा- विमा संरक्षित रक्कम (रु./हे)- 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (रु./हे)- 8 हजार 500 रुपये व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31…

Read More

कोल्हापूर दि : 30 (जिमाका) येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत डी .वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कसबा बावडा) या ठिकाणी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातर्गंत (TPO – HR Meet) हा कार्यक्रम पार पडला . यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम ,कॅम्पस संचालक अभिजीत माने , युवा शक्ती स्किल इंडिया प्रा.लि चे संचालक डॉ सतीश पवार, ज्येष्ठ उद्योजक शाम तोतला , अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी चेडे , जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे , बालाजी बिराजदार आदी उपस्थित होते . यावेळी मार्गदर्शन करताना श्री चेळे म्हणाले , युवकांनी स्वतःच्या क्षमता…

Read More

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजे 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले. तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्तस्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो. अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1…

Read More

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे.…

Read More

कोल्हापूर, दि. २६* : कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे नूतनीकरणानंतर आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नूतनीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून स्मारक भवनाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आमदार अशोक माने, उपमहापौर अक्षय जरग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी…

Read More