Author: admin

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार, दिनांक 10 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 11 जुलै रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता कै. उर्मिला उदय कुलकर्णी यांच्या राहत्या घराची भिंत व छप्पर कोसळून पडलेल्या स्थळाची पाहणी व त्यांच्या निधन पश्चात घरी सांत्वनपर भेट. (स्थळ : लोहार गल्ली, कागल) सकाळी 10.15 वाजता शेंडा पार्क येथील सुरु असलेल्या 600 बेड रुग्णालय, 250 बेड अतिविशेषोपचार रुग्णालय व 250 बेड कर्करोग रुग्णालय येथील बांधकामाची पाहणी. सकाळी 10.30 वाजता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सांगाव,…

Read More

शेती ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरता दिलासा देणे पुरेसे नसून शेतकरी पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, उत्पादनक्षम बनेल आणि भविष्यात कर्जाच्या दुष्टचक्रात अडकणार नाही, अशी दीर्घकालीन व्यवस्था उभी करणे आवश्यक ठरते. याच व्यापक दृष्टिकोनातून राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शाश्वत कृषी विकासाच्या व्यापक…

Read More

कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे कर्ज मागणीचे अर्ज विविध कारणांमुळे बँकांकडे प्रलंबित आहेत अथवा बँकांनी नामंजूर केले आहेत अशा लाभार्थ्यांच्या कर्ज मागणी अर्जाचे पुनरावलोकन, पडताळणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी लिड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व बँका, MSME DFO आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 15 हजार 521 कारागीरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देण्यात आली असून तसे प्रमाणपत्र त्यांना वितरीत करण्यात आले आहे. 11 हजार 246 कारागीरांना त्यांच्या कारागिरीनुसार प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येकी 4 हजार रूपये इतका…

Read More

कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर मार्फत खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण चाचणीकरिता जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभाग असणाऱ्या खेळाडूंना 16 जुलै रोजी होणाऱ्या निवड चाचणीमध्ये भाग घेता येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशाकरिता कुस्ती खेळणारी मुले (05) व मुली (09) खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. कुस्तीचे खेळाडू (मुले व मुली)- वयोगट 12 ते 16 वर्षे, चाचणी कालावधी- 16 जुलै रोजी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मंगळवार पेठ, कोल्हापूर. या चाचणीकरीता जिल्हा विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी असणारे खेळाडू पात्र असणार आहेत. निवड चाचणीसाठी सोबत जन्म दाखला, आधार कार्ड…

Read More

भारत निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी स्वतःची जबाबदारी कशी पार पाडावी आणि नेमके काय करावे, याबाबतची माहिती आपण पाहू. सध्या महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत असून, या काळात बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घराला भेट देत आहेत. या प्रक्रियेचा उद्देश प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीतील नोंद अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह राहावी हा आहे. ही केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधारच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बीएलओ घरभेटीला येण्यापूर्वी नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा आयोगाच्या…

Read More

कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): वैद्यकीय (MBBS, BAMS आदी) व अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या बीए, बीएससी, बीकॉम, डिप्लोमा किंवा इतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपचा अर्ज भरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी NEET, CET व CAP प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळेपर्यंत काही विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरतात. मात्र, नंतर त्याच शैक्षणिक वर्षात किंवा पुढील वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यास, पूर्वीच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यामुळे नव्या व्यावसायिक…

Read More

कोल्हापूर, दि. 08 (जिमाका): पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून, दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत. सध्या उपलब्ध असलेल्या संधींमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड येथे विक्री व विपणन (Sales & Marketing) क्षेत्रात पदवीधरांसाठी १८ जागा असून अर्जाची अंतिम मुदत ३० जुलै आहे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी…

Read More

ल्हापूर, दि. ०८ (जिमाका): राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व नियमबद्ध आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या कायदेशीर व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे कोल्हापूर मंडळही कार्यरत असून, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे. कोल्हापूर मंडळात बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत एकूण १ हजार ३६० खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये कोल्हापूर – ६७०, सांगली – ४५८, रत्नागिरी – १४६ आणि…

Read More

कोल्हापूर, दि. 08 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे, तुळशी नदीवरील- कसबा बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, धामणी नदीवरील- सुळे, वारणा नदीवरील- कोडोली, मांगलेसावर्डे, खोची, शिगाव, चावरे व दानोळी, कडवी नदीवरील-कोपार्डे, सवतेसावर्डे, सरुडपाटणे व शिरगाव, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, शाळी नदवरील- येळाणे, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण,…

Read More

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यावश्यक आहे. मात्र, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारभावातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणा यांसारख्या संकटांमुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देतानाच त्यांना पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा आर्थिक आत्मविश्वास पुनर्स्थापित करून त्यांना नव्याने कर्जपात्र बनविण्याचा दूरदृष्टीचा प्रयत्न आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या कर्जमुक्ती उपक्रमांपैकी एक असलेल्या या योजनेद्वारे सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेची…

Read More