Author: admin

   कोल्हापूर, दि. १९ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ नामांकनामुळे जागतिक नकाशावर झळकलेल्या किल्ले पन्हाळगडावर आज शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा पदयात्रा’ (My Bharat – Mera Yuva Bharat) आणि रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  शिवप्रतिमेचे पूजन आणि पाळणा सोहळा सकाळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पारंपरिक पाळणा सोहळा पार पडला. यावेळी…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) :- जिल्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. हे आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत एक हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. ते म्हणाले या अभियानात तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आजारपणामुळे आर्थिक व मानसिक ताण सहन करणाऱ्या कुटुंबांना दिलासा देणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश असून…

Read More

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर (नागपूर खंडपीठ) यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांच्या पुढाकारातून आयोजित संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी,…

Read More

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत व तालुक्याच्या हद्दीतील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी गावनिहाय 1400 रिक्त ठिकाणांचा जाहिरनामा दि. 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे देय असलेली केंद्रांची संख्या यापूर्वीच पूर्ण झाल्यामुळे मौजे खेबवडे (ता. करवीर) येथील 1 व मौजे देवठाणे (ता. पन्हाळा) येथील 1 असे एकूण 2 केंद्रे जाहिरनाम्यातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता एकूण 1398 ठिकाणांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जाहिरनाम्यानुसार 1398 केंद्रांसाठी एकूण 3615 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 35 अर्ज अपात्र ठरले असून 38 अर्ज दुबार आढळले आहेत. अशा एकूण 73 अर्जदारांची संख्या अपात्र व दुबार यादीत…

Read More

कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी ९ ऑगस्ट २०१९ पासून सुरू असून पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी केले आहे. या ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील आणि भू-अभिलेखांनुसार २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी पात्र आहेत. लाभार्थ्यांनी वयानुसार दरमहा रुपये ५५ ते २०० पर्यंतचा हप्ता वयाच्या ६० वर्षांपर्यंत भरायचा असून केंद्र शासनाकडून तितकीच रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाणार आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास दरमहा रुपये ३ हजार निश्चित पेन्शन मिळणार आहे. नोंदणीसाठी…

Read More

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू सभागृह येथे जिल्हा पुनर्वसन समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती व चाईल्ड हेल्प लाईन यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. कोल्हापूर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांनी बालविवाह रोखण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती (SOP) तयार करावी. ही माहिती गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना देऊन प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच बालविवाहाच्या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावर…

Read More

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): गंभीर आजाराने त्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक पाऊल म्हणून जिल्ह्यात पेलिएटिव्ह (उपशामक) केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पेलिएटिव्ह केअर समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील व डॉ. प्रविण नाईक…

Read More

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): केंद्र शासनाकडून रस्ते अपघातग्रस्तांना सुवर्ण तासात (Golden Hour) तातडीने वैद्यकीय मदत मिळावी आणि मदत करणाऱ्या नागरीकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने राह-वीर योजना राबविण्यात येत आहे. देशात रस्ते अपघात ही गंभीर सामाजिक व आर्थिक समस्या असून देशामध्ये दरवर्षी सुमारे 10 टक्के वाहनसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर अपघात व मृत्युची संख्या सुध्दा वाढत आहे. या पार्श्वभुमीवर अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करणे, समाजात मानवतेची भावना वाढविणे व जनतेस प्रेरणा देऊन निरपराध जीव वाचविण्यास प्रवृत्त करणे, असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीने मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीस अपघातानंतर एका तासाच्या आत (Golden Hour)…

Read More

कोल्हापूर दिनांक 12 – कोल्हापूर शहरातील कदमवाडी ते जाधववाडी रस्त्यालगत असणाऱ्या पुरबाधित जागेत भरदिवसा भराव टाकण्याचे काम सुरू असून त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना पूर परिस्थितीत गंभीर धोका निर्माण होणार असल्याने महानगरपालिकेकडून याबाबत कारवाई होणार का याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कदमवाडी जाधववाडी या रस्त्यालगत असणाऱ्या जागेत पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे कित्येक वर्षे दिसून येते.त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या अपार्टमेंट व घरांमध्ये दरवर्षी पाणी घुसते.या पुरबाधित जागेतून पलिकडे पाणी न जाता ते पाणी येथेच साचून राहते.त्यात आता याच क्षेत्रात कोणीतरी भराव टाकण्याचे काम करत असून त्यामुळे थोडा जरी पूर आला तरी यामुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना धोका निर्माण होऊन पाणी घरात घुसण्याची…

Read More