Author: admin

कोल्हापूर, दि.11 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने एकूण रु. 750 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी यापूर्वी 20 मे रोजी 150 कोटी रुपयांचा निधी महामंडळास प्राप्त झाला होता. या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. त्यानंतर व्याज परताव्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने 8 जुलै रोजी शासनाकडे रु. 400 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महामंडळाच्या मागणीची दखल घेऊन शासनाने 3 ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करून रु. 300 कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार हा 300 कोटींचा निधी 8 ऑगस्ट रोजी…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): भारत सरकारच्या हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत खालील बाबी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. हर घर तिरंगा 2026 अभियानाचा कालावधी 9 ते 17 ऑगस्ट असा आहे. या कालावधीत नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकविता येईल. तथापि, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान व पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने जुलै 2022 मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार, खुल्या जागेत…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे व हळदी, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड असे एकूण 13 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.31 (99 टक्के), तुळशी 3.40 (98 टक्के), वारणा 30.56 (89 टक्के), दूधगंगा 22.05 (87 टक्के), कासारी 2.40 (86 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.48 (91 टक्के), पाटगाव 3.26 (88…

Read More

कोल्हापूर दि. 7 (जिमाका): संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऑगस्ट 2024 रोजी दुर्दैवाने आग लागली आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण कला जगताच्या आणि जिल्हावासीयांच्या हृदयाला चटका लावणारी ही घटना होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती, आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे पूर्वस्थितीसारखेच वैभव निर्माण केले जाईल. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन रविवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांच्या…

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरापर्यंत दर्जेदार शिक्षण संस्था उभारून त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सहकार आणि सेवाभाव यांचा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला.” “त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशात घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने समाजाचा मोठा आधारवड हरपला आहे,” असेही…

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचा दीप ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्था दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवेचे उत्कृष्ट केंद्र बनल्या. महाराष्ट्रासह देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि समाजसेवेचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना तसेच असंख्य विद्यार्थ्यांना व अनुयायांना हे…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राज्यांतर्गत खरीप हंगाम 2026 मधील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, मूग व उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील पीकस्पर्धा टॅबमधून ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HJ दिनांक 5 ऑगस्टपासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 5 व 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्वीकारण्यात येतील. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच Demand Draft…

Read More

मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या शोकसंदेशात प्रताप सरनाईक म्हणाले की, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. समाजहिताची जाणीव ठेवून उभारलेला त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.” “डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी, समाजाभिमुख विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास…

Read More

मुंबई दि. ४: डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणसंस्था उभारणारे प्रशासक नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणाला नवे क्षितिज देणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी होते अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, त्यांनी उभी केलेली शैक्षणिक चळवळ लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठातून विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशातील हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे. देशभरात सात स्वतंत्र विद्यापीठांची निर्मिती हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा ऐतिहासिक ठेवा असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई येथे उभारलेल्या अत्याधुनिक रुग्णालयांमुळे लाखो नागरिकांना दर्जेदार…

Read More