Author: admin

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे.…

Read More

कोल्हापूर, दि. २६* : कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे नूतनीकरणानंतर आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नूतनीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून स्मारक भवनाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आमदार अशोक माने, उपमहापौर अक्षय जरग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी…

Read More

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्या वतीने दसरा चौक येथे समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समता दिंडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. पालकमंत्री आणि मान्यवरांनी समता दिंडीच्या पालखीला खांदा दिला. यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त…

Read More

कार्यक्षेत्रातील गावांची अधिसूचना प्रसिद्ध कोल्हापूर, दि. 24: राज्य शासनाच्या निर्णयानुसार चंदगड तालुक्यात मजरे कार्वे येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात येत असून, त्याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या कार्यालयाचे मुख्यालय मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे राहणार असून, कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तुर्केवाडी, माणगाव, कोवाड, चंदगड, नागनवाडी आणि हेरे या सहा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिली आहे. या मंडळांअंतर्गत चंदगड तालुक्यातील शेकडो महसूल गावे नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे महसूलविषयक सेवा, दैनंदिन प्रशासकीय कामकाज, दाखले, नोंदी तसेच विविध शासकीय सेवा नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि स्थानिक…

Read More

खरीप पीक कर्जाचे सर्व उद्दिष्ट पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड कोल्हापूर, दि. 26* : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता तब्बल 47 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून सर्व बँकांनी समन्वयाने काम करून हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये तसेच जुलैअखेर पीक कर्ज वितरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक (बँक…

Read More

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2026 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धेची वैशिष्टे – पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै- मूग व उडिद, 31 ऑगस्ट- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र आहे. सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये 300 तर आदिवासी गटासाठी रक्कम रुपये 150 असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार रविवारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार ,अन्न औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत पिरवाडी येथे हातभट्टी दारू विक्री करणारी बेबी रवी मछले ही संशयित महिला विनापरवाना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने या महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आला. पिरवाडी गावातील बेबी रवी मछले या महिलेवर सन 2025 पासून ते आज अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गावठी हातभट्टी…

Read More

कोल्हापूर, दि.20 (जिमाका) : संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी शक्तीपीठाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थिती लावली. मंदिराच्या कामाच्या शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासोबत दर्शन घेतले. दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण देवस्थान असणाऱ्या व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणून श्रध्देय असणाऱ्या या मंदिराप्रति केंद्रीय मंत्री अमित शहा यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे. आज मंदिरात आगमन झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या विकास कामांकडे लक्ष देत नव्याने बसवण्यात आलेल्या सुवर्णकलशाकडे देखील लक्ष वेधले. मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

कोल्हापूर दि : 20 (जिमाका) दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत (दादा) पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री…

Read More

मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ कोल्हापूर, दि. २० (जि.मा.का.)* : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग…

Read More